Ad will apear here
Next
अरुण म्हात्रे
‘...ती वेळ निराळी होती,  ही वेळ निराळी आहे...’ असे लिहिणाऱ्या कवी अरुण म्हात्रे यांचा २५ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आज ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
...............

अरुण म्हात्रे

२५ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबईत जन्मलेले अरुण म्हात्रे हे प्रामुख्याने गेय कविता लिहिणारे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रेमातली आर्तता, विव्हलता, अगतिकता अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या कविता हे त्यांचं वैशिष्ट्य. 

छातीवर फुले फुलण्याची
वाऱ्यावर मन झुलण्याची
ती वेळ निराळी होती
ही वेळ निराळी आहे...
डोळ्यांत ऋतूंचे पाणी
मौनात मिसळते कोणी
वाळूत स्तब्ध राहताना
लाटेने गहिवरण्याची
ती वेळ निराळी होती
ही वेळ निराळी आहे...

अशी तरल भावना मांडणारे अरुण म्हात्रे तितक्याच सहजतेने असंही सांगतात...

विसरता येत नाही असे नसतेच काही
मनाला सांदणारी नवी मिळतेच शाई!
चुकांना टाळताना किती केली हुशारी
नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही!
तिला राणी म्हणालो तिला देवी म्हणालो
किती म्हटले तरीही जरा उरतेच काही!
नदीपात्रांमध्ये मी सोडल्या दीपमाळा
तरी गंगाजलातून निघे भलतेच काही!
मानतो कागदाला मानतो लेखणीला
कळे शब्दांत अंतिम असे नसतेच काही..

त्यांची कविता एक छान लय घेऊन आलेली आहे. सुंदर शब्द, सुंदर कविता, सुंदर गाणी माणसाला नेहमीच उत्तेजना देतात आणि म्हणून कविता सामान्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि कवितेविषयी लोकांच्या मनांत आवड उत्पन्न व्हावी या हेतूने अरुण म्हात्रे यांनी आपल्या सहा कवी मित्रांसह ‘कवितांच्या गावा जावे’ या रसिल्या मैफलीचे गावोगावी जाऊन सादरीकरण करायला सुरुवात केली आणि पाहतापाहता तो कार्यक्रम लोकप्रिय झाला होता. महाराष्ट्रातल्या अगदी आडगावीसुद्धा कविता पोहोचवण्याचं श्रेय अरुण म्हात्रे यांच्याकडे जातं.

म्हात्रेंचं व्यक्तिमत्व बहुआयामी आहे. कॉमर्सचे पदवीधर झाल्यावर त्यांनी अकाउंटन्सीची कामं केली. काही दिवस प्राध्यापकी केली. नाटकं दिग्दर्शित केली. संगीताचे कार्यक्रम केले. अनेक सामाजिक मोर्चांमध्ये भाग घेतला. काही आंदोलनांत कारावाससुद्धा भोगला.

‘उत्तम कवी होण्यसाठी तुम्हाला नुसतं पुस्तकं वाचून नाही चालत, तुम्हाला माणसं वाचावी लागतात, तुम्हाला समाज वाचावा लागतो,’ असं ते म्हणतात. 

त्यांना बहिणाबाई पुरस्कार, वासंती गाडगीळ पुरस्कार, स्नेहदा चषक- अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

ऋतू शहरातले, ते दिवस आता कुठे?, कोसो मैल दूर आहे चांदणी - अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZWJCCR
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language